लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ‘राजा रानीची गं जोडी,‘जीव झाला येडापिसा’ या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनु आणि सिद्धार्थची केमिस्ट्री नव्याने अनुभवता येणार आहे.

अलिकडेच या मालिकेच्या नव्या भागांचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. या प्रोमोमध्ये अनु सिद्धार्थला गोडधोडबरोबर काही चमचमीत, आंबट करायला शिक, असं सांगते. त्यामुळे आता या नव्या भागात अनु आणि सिद्धार्थच्या कोणती तरी नवीन गोड बातमी देणार असं प्रेक्षकांना वाटत आहे.त्यामुळे या नव्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आखून दिलेल्या नियमांचं योग्यरित्या पालन करत सेटवरील चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे.

Marathi actress bhagyashri dalvi entry on gharoghari matichya chuli serial
Video: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीची ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

“जवळपास चार महिन्यांनंतर मी सेटवर गेलो होतो आणि मालिकेची संपूर्ण टीम माझ्यासमोर होती. परंतु, चार महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर आम्ही भेटतोय असं अजिबात वाटलं नाही. आताच काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून आम्ही परत भेटलोय असंच वाटत होतं.परंतु, मंदार देवस्थळी यांचे लाइट्स, कॅमेरा अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन हे शब्द कानावर पडल्यावर पोटात गोळा आला आणि मालिकेचा पहिला दिवस आठवला”, असं अभिनेता शशांक केतकर म्हणाला.

दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. येत्या २१ जुलैपासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.