ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांचं सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांचे पार्थिव आज मुंबईतील वर्सोवा, अंधेरी येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ऋतुराज सिंह हे टीव्हीवरील दिग्गज अभिनेते होते, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी टीव्ही कलाकार पोहोचले.

ऋतुराज सिंह यांच्यावर आज (२१ फेब्रुवारी) ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाठी घरी ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अभिनेता नकुल मेहता, हितेन तेजवानी व गौरी, अनूप सोनी पोहोचले. त्यांनी अंत्यदर्शन घेत ऋतुराज सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कलाकार भावुक झाले होते.

when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Death anniversary of film industry actor director singer M Vinayak
मला उमगलेले माझे दादा!
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
Ramgiri Maharaj, Prophet Muhammad,
Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..
Thane, Anita Birje, Eknath Shinde, Anita Birje Joins Shinde Group , Anita Birje Joins Shinde Group, Uddhav Thackeray, Shiv Sena, Anand Dighe, Political Shift, Saffron Week, Dharmaveer Mukkam Post Thane, Shiv Sena Mahila Aghadi
दिघेंची ‘ही’ वाघीण ठाकरे गटातून शिंदे गटात, धर्मवीर चित्रपटात गाजले होते पात्र
Rohini Hattangadi, actors, advice,
जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नवोदित कलाकारांना कानमंत्र; म्हणाल्या, ‘अभिनय करताना’…

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय बंद पडल्याने निधन

दरम्यान, ऋतुराज सिंह यांचं हृदय बंद पडल्याने निधन झालं. “ते आजारी होते. स्वादुपिंडाशी संबंधित काही समस्यांमुळे १५ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ते घरी परतले होते, पण काल त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं,” अशी माहिती त्यांचे मित्र व अभिनेते अमित बहल यांनी दिली होती.