राज्यात मान्सूनचे होणारे आगमन लक्षात घेऊन सोमवारपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारनेच सोमवारी समुद्रात मासेमारीवरील बंदीचा आदेश काढल्याची माहिती मत्स्य व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असून समुद्रही खवळलेला असतो. सर्वसाधारणपणे १५ जूननंतर मासेमारीवर बंदी घातली जाते.