रहिवासी सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले आहेत याचा अंदाज घेऊन ठाण्यातील वर्तकनगरमधील श्रमविहार इमारत क्रमांक ४१ मधील चार रहिवाशांच्या घरांमध्ये अज्ञात चोरटय़ांनी चोऱ्या केल्या आहेत.
 एका घरातून चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. उर्वरित तीन घरांमधील रहिवासी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील चोरीला गेलेल्या मालाचा पोलीस अंदाज घेऊ शकले नाहीत.
या इमारतीमधील रहिवासी भावना देसाई यांचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. २३ मे ते २५ मे रोजी रात्रीच्या वेळेत चोरटय़ांनी या इमारतीमधील भावना यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरातील लॅपटॉप, रोख रक्कम, सोने असा ४ लाखांचा ऐवज लंपास केला.
याच इमारतीमधील तीन रहिवाशांच्या घरात चोरटय़ाने चोऱ्या केल्या आहेत. हे रहिवासी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातून चोरीस गेलेल्या ऐवजाचा अंदाज पोलीस करू शकले नाहीत. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.