मुंबईत रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळया भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे बेस्टने अनेक बसेसचे मार्ग वळवले आहेत. मुंबईत आठ भागात पाणी साचले आहे. बेस्टने शहर आणि उपनगरातील ४७ मार्गावरील बसेस वळवल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होऊ शकते. मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागात पाणी साचले आहे.