राज्यातील ११६ भूखंड गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शाहीद बलवा, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांच्या संस्थांना हे भूखंड देण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. गेली चार वर्षे विधिमंडळात मांडूनही व मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदने देऊनही सरकारने कारवाई केली नाही. मात्र आता काही प्रकरणात पुण्यातील पोलिस ठाण्यात गुरुवारपासून गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाल्याचे खडसे यांनी सांगितले.