वीज वाचवून जनजागृती करण्यासाठी रिलायन्स एनर्जी तफे शनिवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ या काळात एक तासांचा ‘अर्थ अवर’ घोषित करण्यात आला आहे. या काळात मुंबईकरांनी अनावश्यक वीज बंद करण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. वीजेचा गैरवापर टाळून वीज बचतीसाठी अशा अर्थ हावर चे आयोजन करण्यात येते. रिलायन्स आपल्या सर्व आस्थापनांमध्ये या काळात अनावश्यक वीजेचा वापर बंद करणार आहे.