‘पॅरोल’, ‘फर्लो’ तसेच जामिनावर बाहेर पडून फरारी झालेल्या आरोपींची संख्या गेल्या दोन वर्षांत घटली असून २२ हजारांवरून हा आकडा १० हजारांवर आल्याचा दावा राज्य सरकारतर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. फरारी आरोपींना युद्धपातळीवर शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे हे शक्य झाल्याचेही या वेळी न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या चपराकीनंतर पोलिसांतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.