राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अधूनमधून अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चाही होतात. अशातच काही दिवसांपूर्वी अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या तिघांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (९ मार्च) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ अशी रस्सीखेच सुरू आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “माझे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे होर्डिंग लावले गेले. ते होर्डिंग आमच्या पक्ष कार्यालयाच्या समोरच लावले गेले. पहाटे येऊन कुणीतरी लावायचं. त्या होर्डिंगची साईजही एकच होती. हा कुणीतरी केलेला चावटपणा आहे.”

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा

“…त्यांना ग्रामीण भागात आम्ही हौसे, नौसे, गौसे म्हणतो”

“उद्या कुणालाही वाटलं की, मुख्यमंत्री व्हावं, तरी ते शक्य नाही. आम्ही १४५ आमदारांचं संख्याबळ मिळवण्यात यशस्वी झालो, पाठबळ उभं केलं तर गोष्ट वेगळी आहे. जसं मागे उद्धव ठाकरेंनी केलं, नंतर एकनाथ शिंदेंनी केलं. काही लोक अतिउत्साही असतात. त्यांना ग्रामीण भागात आम्ही हौसे, नौसे, गौसे म्हणतो,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

“…त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतात”

“ते असं उत्साहाने काही तरी करायला जातात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतात. तसेच विरोधकांना चर्चेला एक मुद्दा मिळतो. कारण नसताना माध्यमांनाही प्रश्न विचारायला मुद्दा मिळतो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : नागालँडमध्ये नवाब मलिकांना तुरुंगात टाकणाऱ्या भाजपाबरोबर जाऊन का बसलात? अजित पवार म्हणाले…

तुम्ही तिघे या विषयावर बोललात का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी तर माझी भूमिका लगेच स्पष्ट केली. मी शिवाजीराव गर्जेंबरोबर बोललो आणि हे होर्डिंग कोण लावतं आहे, त्याचा बोलवता धनी कोण आहे, मास्टरमाईंड कोण आहे हे बघा असं सांगितलं.”