तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समन्स बजावले आहे. त्यांची बुधवारी चौकशी होणार आहे. या वृत्तास सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप के ले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसेच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद के ले होते.

याप्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी के ली. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

प्राथमिक चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने आतापर्यंत सिंह, अ‍ॅड. पाटील, वाझे, साहाय्यक आयुक्त संजय पाटील, पश्चिाम उपनगरांतील बार मालक महेश शेट्टी यांच्यासह प्रकरणाशी संबंधित अन्य काहींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. बुधवारी देशमुख यांच्याकडे हे पथक चौकशी करणार आहे.