दिवा भागात विजेचा धक्का लागून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच याच परिसरात असलेल्या एका चाळीजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरलेल्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का लागून गुरुवारी सकाळी पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला.
दोन निष्पापांचे बळी गेल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाण्यात विजेचा प्रवाह कसा उतरला याचा शोध सुरू केला असता वीजचोरांच्या प्रतापामुळे हे बळी गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
वीजचोरी करत असताना एकाच सर्किटवर विजेचा जास्तीचा भार आल्याने कंडक्टर तुटला आणि वीजवाहिनी पाण्यात खाली पडली, असा बचाव महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, दोन बळी गेल्यानंतरही दिव्यात वारंवार पाणी साचते कसे याचा खुलासा करण्यासाठी महापालिकेतील एकही अधिकारी पुढे आला नाही. तर पाणी साचलेला विभाग कुणाच्या अधिकारात येतो हे सांगण्यास महापालिकेतील एकही वरिष्ठ अभियंता तयार नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2013 रोजी प्रकाशित
दिव्यात पुन्हा विजेच्या धक्क्य़ाने बालकाचा मृत्यू
दिवा भागात विजेचा धक्का लागून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच याच परिसरात असलेल्या एका चाळीजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरलेल्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का लागून गुरुवारी सकाळी पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला.
First published on: 28-06-2013 at 04:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child dies in diva by electric shock