काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या वतीने उद्या विधिमंडळात सादर करण्यात येणाऱ्या श्वेतपत्रिकेचा वापर होणार आहे. तसेच ‘कॅग’च्या अहवालातही आधीच्या आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांवर ठपका ठेवण्यात येणार असल्याने सत्ताधारी भाजपची नेतेमंडळी खुशीत आहेत.  आघाडी सरकारच्या काळातील आर्थिक परिस्थिती तसेच चुकीच्या धोरणांमुळे सरकारची तिजोरी रिकामी होणे यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार असलेल्या श्वेतपत्रिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.