मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान म्हणजेच फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान सात महिन्यांत ८ हजार ५८४ बालमृत्यू झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. सुधीर मुनगंटीवार, संजय केळकर यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात टोपे यांनी सात महिन्यांत ०-५ वयोगटांतील बालकांचा मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाला असून बालमृत्यूचे प्रमाण हे औद्योगिक व आर्थिकदृष्टय़ा सबळ असणाऱ्या अशा नागपूरमध्ये सर्वाधिक ९२३, औरंगाबाद येथे ५७८, मुंबईत ७९२, पुण्यात ४२२ आणि नाशिकमध्ये ४१७ बालमृत्यूची नोंद झाल्याची माहिती दिली. करोनाकाळात आरोग्य सेवांचा बळकटीकरण करण्यासाठी सरकारने समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, नवजात शिशू कोपरा, ग्राम बाल विकास केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात बालकांची काळजी, जननी सुरक्षा योजना अशा योजना-उपक्रम राबविले जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

उष्माघात उपचाराची सोय

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान

 राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात होणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत तसेच आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जात असल्याचेही टोपे यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.