दादर पश्चिमेकडील पाटीलवाडी ही झोपडपट्टी म्हणून घोषित करावी व झोपु योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी २००६ पासून तेथील रहिवासी माझ्याकडे करीत होते. परंतु पालिका प्रशासन दखल घेत नव्हते. त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व योग्य ती कारवाई व्हावी यासाठी २००८ मध्ये पत्र दिले. माझ्या पत्रानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पालिकेने सदरचा भूभाग झोपडपट्टी म्हणून घोषित केला. त्यामुळे माझ्या प्रतापामुळे चाळीची झोपडपट्टी झाली हा मथळा दिशाभूल व माझी बदनामी करणारा आहे, असा खुलासा माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे. ‘मनोहर जोशी यांचा प्रताप – जावयासाठी चाळीची झोपडपट्टी केली!’ या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात जोशी यांनी हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar joshi refuse the allegation over slum declare
First published on: 15-06-2013 at 04:23 IST