समुद्रातील दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती जाळ्यात अडकल्यानंतर त्यांची सुटका करावी लागते. प्रसंगी मच्छिमारांना त्यांचे जाळे कापावे लागते. जाळी कापून दुर्मिळ संरक्षित प्रजातींची सुटका करण्यात आल्याच्या आठ प्रकरणांमध्ये कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>मुंबई : नायर इस्पितळातील औषध दुकानात परवाना नसलेल्या औषधांचा पुरवठा !

House burglars in Dombivli and Navi Mumbai arrested from Uttar Pradesh
डोंबिवली, नवी मुंबईत घरफोड्या करणारे सराईत चोरटे उत्तरप्रदेशातून अटक
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ मध्ये अनेक सागरी प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये निळा देव मासा, ब्रुडीज देवमासा, डॉल्फिन, करवत मासा, व्हेल शार्क, सागरी कासवे आदी प्रजातींचा समावेश आहे. या दुर्मिळ आणि संरक्षित सागरी जीवांचे संवर्धन व्हावे यासाठी कांदळवन कक्ष आणि मत्स्य विभाग, राज्य सरकार यांनी डिसेंबर २०१८ पासून भरपाई योजना सुरू केली आहे. संरक्षित प्रजाती मासेमारीच्या जाळ्यात अडकल्या, तर जाळे कापून त्यांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडणाऱ्या मच्छिमारांना कापलेल्या जाळ्यापोटी भरपाई म्हणून कमाल २५ हजार रुपये दिले जातात. कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानाने मंगळवारी नुकसानभरपाई योजनेअंतर्गत एक लाख रुपये भरपाई दिली. रत्नागिरी येथील सहा आणि सिंधुदुर्ग येथील दोन मच्छिमारांकडून प्राप्त झालेल्या एकूण आठ प्रकरणांमध्ये चार ग्रीन सी कासव, दोन ऑलिव्ह रिडले कासव आणि दोन हॉक्सबिल समुद्री कासवांची जाळे कापून सुटका करण्यात आली होती, अशी माहिती कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठानामधील अधिकाऱ्यांनी दिली.