शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत दिरंगाई केल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल नार्वेकरांच्या घाना दौऱ्याबाबत मोठा दावा केला. ते शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

बंडखोर आमदार आणि त्यांच्यावरील अपात्रतेची सुनावणी यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात संविधानाविरोधात, कायद्याविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकार चालवलं जात आहे. दुसरीकडे हेच लोक आंतरराष्ट्रीय मंचावर लोकशाहीची प्रवचने झोडतील.”

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
eknath shinde fadnavis and ajit pawar expressed confidence on mahayuti victory in assembly polls
यंदा ‘मी पुन्हा येईन’ नाही, तर तुकोबांच्या ओव्या! विधानसभेच्या अखेरच्या सत्रात सत्ताधारी सावध
Parliament Session 2024 LIVE Updates in Marathi
“माझ्या भाषणातील काही भाग वगळणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात”, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; म्हणाले..
Ambadas Danve
मोठी बातमी! अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन; विधानपरिषदेत ठराव संमत
Sanjay Raut on Ambadas Danve
“भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने…”, विधानपरिषदेतल्या राड्यानंतर संजय राऊतांकडून अंबादास दानवेंची पाठराखण
ajit pawar suresh dhas
“…अन् मी कपाळावर हात मारला”, अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा
Opponents displeasure over emergency protest proposal
आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर विरोधकांची नाराजी

“नार्वेकरांचं नाव आधी घानाला जाणाऱ्यांमध्ये नव्हतं”

“मला मिळालेल्या माहितीनुसार, घानात जे शिष्टमंडळ जाणार होतं त्यात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव नव्हतं. मात्र, अपात्रता सुनावणीला उशीर करण्यासाठी आणखी एक कारण हवं म्हणून त्या शिष्टमंडळात त्यांचं नाव टाकून देण्यात आलं. ही आपल्या लोकशाहीची अवस्था आहे आणि हे घानात लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“मणिपूरची परिस्थिती भयंकर”

मणिपूरमधील हिंसाचारावर संजय राऊत म्हणाले, “मणिपूरची परिस्थिती भयंकर आहे. सरकार, गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान या सर्वांचं हे अपयश आहे. विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून जीवे मारण्यात आलं. सरकार काय करत आहे?”

हेही वाचा : “४ महिने उलट तपासणी, ४ महिने साक्ष अन् आठवड्यातून दोनदाच…”, परबांनी सांगितला नार्वेकरांचा ‘तो’ डावपेच

“मोदी सरकारने नवं संसद भवनात मणिपूरवर चर्चा करू दिली नाही”

“मोदी सरकारने नवं संसद भवन उभारलं, मात्र तेथे आम्हाला मणिपूरवर चर्चाही करू दिली नाही,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.