scorecardresearch

Premium

अॅट्रॉसिटीचा गैरवापर दलितांकडून नव्हे तर स्थानिक नेतृत्वाकडून: शरद पवार

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी आपली भूमिका नसून उलट त्याचा गैरवापर करणाऱ्यांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. या कायद्याचा गैरवापर दलितांकडून नाही तर स्थानिक राजकारण्यांकडून केला जातोय.

Mumbai , BMC election 2017 , Sharad pawar , Uddhav Thackeray , Shivsena, BJP , BMC, alliance , युती तुटली, स्वबळावर लढणार, शिवसेना, भाजप, मुंबई, Bmc election in mumbai, BMC Election Mumbai, BMC Election news in Marathi, BMC election 2017, BMC election Mumbai Latest news, BMC Election Ward, BMC Election Ward Mumbai,BMC Election Result, BMC Latest Result 2017, BMC Result 2017, BMC Election Election Result 2017,BMC Election Mumbai Exit Poll 2017,BMC Election Result Mumbai, Mumbai BMC Latest Result 2017, Mumbai BMC Result 2017, Mumbai BMC Election Election Result 2017
Sharad pawar : उद्धव यांच्या या घोषणेनंतर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, इतके वर्ष एकत्र असणारे पक्ष वेगळे झाले, या गोष्टीचे अतीव दु:ख झाल्याचे म्हटले. विशेष म्हणजे यावेळी पवारांच्या चेहऱ्यावर मिष्किल हसू होते.

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी आपली भूमिका नसून उलट त्याचा गैरवापर करणाऱ्यांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. या कायद्याचा गैरवापर दलितांकडून नाही तर स्थानिक राजकारण्यांकडून केला जातोय. स्थानिक राजकारणामुळे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात, त्यामुळे अशांवर सरकारचा वचक असला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कोपर्डी घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, असे शरद पवार यांनी नुकतेच म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. यावर त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. कुठल्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये अशी आमची भूमिका आहे. गैरवापर होत असेल तर शासनाने त्यांचा बंदोबस्त करावा. स्थानिक नेत्तृत्वच आपल्या राजकीय भांडणासाठी अशा कायद्याचा आधार घेतो. सवर्णांच्या भांडणांमध्ये दलितांचा वापर केला जातो. दलितांकडून या कायद्याचा गैरवापर होत नाही, अशी पुनरूक्ती त्यांनी केली.
मराठवाड्यात आयसिसचे पाळेमुळे रूजल्याचे सरकारचे म्हणणे त्यांनी खोडून काढले. मराठवाड्यातील मुस्लिम तरूणांबाबत सरकारची भूमिका आततायीपणाची आहे. पोलीस मुस्लिम युवकांना संशयित म्हणून ताब्यात घेतात आणि गुन्हेगारांप्रमाणे त्यांना वागणूक देतात. हे चुकीचे आहे. एखाद्याला जेव्हा अटक करता, तेव्हा २४ तासांत त्याला न्यायालयासमोर उभे करणे गरजेचे असते. पण तसे होताना दिसत नाही. या युवकांना पोलीस ताब्यात घेतात आणि ८-९ वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता होते. पण तोपर्यंत त्या युवकाचे आयुष्य उद्धवस्त झालेले असते. दहशतवादाचे कारण करून मराठवाड्यातील मुस्लिम समाजातील युवकांची सरसकट धरपकड गैर आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पण एखाद्या निरापराध्याला शिक्षा होऊ नये.
आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडले. हे आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी आदींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar speaks on a atrocity act

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×