नागपूर : खान अब्दुल गफ्फार खान हे आयुष्यभर सत्य, अहिंसा सांगत राहिले. त्यांना गांधी विचाराशी निष्ठेचे मोल चुकवावे लागले. आपण त्यांना भारतरत्न प्रदान करून प्रायश्चित केले, असे मत ज्येष्ठ संपादक, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

खान अब्दुल गफ्फार खान जे सरहद्द गांधीच्या नावाने ओळखले जातात. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी आवृत्ती ‘माझे जीवन आणि संघर्ष’ या नावाने प्रसिद्ध झाली. या आवृत्तीची प्रस्तावना द्वादशीवार यांनी लिहिली आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात शनिवारी या प्रस्तावनेचे वाचन द्वादशीवार यांनी केले. याप्रसंगी मंचावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, अॅड. फिरदोस मिर्झा, चेतन कोळी, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, रुपाली मोरे, प्रेमकुमार लुनावत, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Amol Mitkari Post That Photo
Shivaji Maharaj Statue : महायुतीत बेबनाव? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी पोस्ट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले..
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
father-in-law, extraordinary personality,
माझे सासरे : एक असाधारण व्यक्तिमत्त्व
Death anniversary of film industry actor director singer M Vinayak
मला उमगलेले माझे दादा!
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..

हेही वाचा – अजित पवार यांना केदार यांचा टोला; म्हणाले, “विधानसभा निवडणुका येऊ द्या, बारामतीमध्ये…”

यावेळी द्वादशीवार म्हणाले, गफ्फार खान हे महात्मा गांधी यांचे सर्वश्रेष्ठ अनुयायी होते. ते आयुष्यातील २७ वर्षे तुरुंगात होते. त्यापैकी भारतातील तुरुंगात १० वर्षे आणि पाकिस्तानातील तुरुंगात १७ वर्षे होते. त्यांनी धर्मनिष्ठेपेक्षा स्वातंत्र्यनिष्ठा मोठी मानली. त्यांनी देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. त्यांच्याकडून त्यांनी सर्वधर्म समभाव स्वीकारला. त्यानंतर महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि आयुष्यभर गांधीवादी झाले.

फाळणीनंतर अब्दुल गफ्फार खान पाकिस्तानमध्ये गेले. तेथे त्यांनी गांधी विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. गांधी विचाराचा वारसा सांगणाऱ्या गफ्फार खान यांचा पाकिस्तानात छळ झाला. त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, ते आयुष्यभर सत्य, अहिंसा सांगत राहिले. त्यांनी आयुष्यभर गांधी निष्ठेचे मोल चुकवले आहे, असेही द्वादशीवार म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ पोलिसांची नामी शक्कल अन् सावज अलगद जाळ्यात अडकले; दुचाकी चोरीचे…

भारतात गांधींच्या नेतृत्वाखाली अब्दुल गफ्फार खान यांचे सर्व काही ठीक सुरू होते. ते ४७ वर्षे गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. महात्मा गांधींप्रमाणे खान यांनी देखील फाळणीचा कडाडून विरोध केला. ते अत्यंत त्वेषाने बॅरिस्टर जिनाविरुद्ध पाकिस्तानच्या निर्मितीविरुद्ध लढत होते, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.