लोकसत्ता टीम

चंद्रपूर: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकीकडे शासन नवनवीन उपक्रम राबवीत आहे.तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निवेदनातून मागणी करूनही शिक्षण विभागाला जाग येत नसल्याने अखेर संतप्त पालकांनी चक्क कुलूप ठोकुन शाळा बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Like Pooja Khedkar 359 candidates grabbed the job
पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…
Badlapur School Case, victim girl Badlapur,
Badlapur School Case : अत्याचारानंतर वैद्यकीय तपासणीसाठीही चिमुकलीची फरफट
Badlapur News
Badlapur Crime : “माझ्या मुलाला सोडा, मला..” बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक होताच आईचा आक्रोश
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
self-reliance, school play, responsibility, vegetables, family values, loksatta balmaifal
बालमैफल: सोनाराने टोचले कान
Assam Hospital Withdraws Adivsory
Unscrupulous People : “वाईट प्रवृत्तीची माणसं आकर्षित होतील असं…”, महिला डॉक्टरांसाठी सूचना; टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मागे घेतले परिपत्रक!

गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथिल जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ वर्ग असून विद्यार्थी संख्या ६६ इतकी आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ दोन शिक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-अमरावती, चिखलदरा, अकोल्यात बालमृत्यू वाढले

त्यापैकी एका शिक्षकाकड़े मुख्या ध्यापकाची जबाबदारी तर अन्य एका शिक्षकाकड़े अध्यापणाची जबाबदारी देण्यात आली. दोन शिक्षकांना एकाच वेळेस इयत्ता पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवीने अशक्य आहे. दोन शिक्षक दोन वर्गात शिकविण्यासाठी गेले तर इतर वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ होतो आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी अन्य एका शिक्षकाची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन शिक्षण विभागाला दिले. मात्र तीन ते चार दिवस लोटूनही शिक्षण विभागाला जाग न आल्याने आज शनिवारला संतप्त पालकांनी चक्क शाळेला टाळे लावले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे एक शिक्षक देण्यात यावा अशी मागणी ३ ऑक्टोबरला निवेदनाद्वारे केली होती. ५ ऑक्टोबरला शिक्षकाची निवड न केल्यास शनिवार ७ ऑक्टोबरला शाळा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आज शनिवार असल्याने सकाळी सात वाजता विद्यार्थी आणि ग्रामस्थ शिक्षकाच्या प्रतीक्षेत होते. मात्र मागणी केलेले शिक्षक उपस्थित न झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी चक्क कुलूप ठोकून शाळा बंद केली. जोपर्यंत शिक्षक येणार नाही तो पर्यन्त शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.