लोकसत्ता टीम

अकोला : राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाय-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
captagon drug
‘गरिबांचे कोकेन’ म्हणून ओळखले जाणारे कॅप्टॅगॉन नक्की काय आहे? या गोळ्या चर्चेत येण्याचं कारण काय?
20 percent increase in hernia in youth
तरूणांमध्ये हर्नियाच्या त्रासात २० टक्के वाढ!
Vaccination in cattle
राज्यातील पशुधन रोगमुक्त जाणून घ्या, पशुसंवर्धन विभागाने नेमकं काय केलं
new cyber police station, Thane
ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता
olympic medals actual price
ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?

वंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाय-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेत गावोगावात गाय-म्हशींची तपासणी व उपचारावर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी सांगितले.

तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गास-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते. गाय- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.

आणखी वाचा-हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार

अभियानामध्ये पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाय-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्यावर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.