चंद्रपूर : शेतीची कामे आटोपून बैलगाडीने घरी परत येत असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्याने बैलगाडी तलावात नेली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह शेतकरी तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथे सोमवारी उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्यासह दोन बैलांचा दुर्दैवी अंत झाला.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

Solapur, mangalvedha taluka, 8 Year Old Girl Dies, 8 Year Old Girl Dies Slipping Into Water, Trying to Drink water, drought in Solapur, girl sink and dies in Solapur,
पिण्याच्या पाण्यासाठी गेला बालिकेचा मंगळवेढ्यात बळी
two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
titwala farmer death marathi news
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

भास्कर बापूजी साळवे (वय ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवार १६ ऑक्टोबरला भास्कर साळवे शेतीची कामे आटोपून सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परत येत होते. दरम्यान, बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडी थेट तलावात नेली. पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यासह दोन्ही बैल पाण्यात बुडाले. सायंकाळी उशिरार्यंत भास्कर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता तलावात मृत बैल व बैलगाडी दिसून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा : गडचिरोली : आलापल्ली वन विभागाच्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी त्रस्त

पोलिसांनी बचाव पथकासह शोधमोहिम राबवून सोमवारी सकाळी शेतकऱ्याच्या मृतदेहासह दोन बैलांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढले. या घटनेमुळे धानापूर गावात शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडवर घरातील कर्ता पुरुष काळाने हिरावल्याने साळवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.