नागपूरमध्ये रविवारी ( २६ मार्च ) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

“लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

हेही वाचा : “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

“राजनीती म्हणजे लोकनिती, धर्मनीती…”

“राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीती म्हणजे लोकनीती, धर्मनीती आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,” असंही नितीन गडकरांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…

“मी प्रेमाने नाहीतर ठोकून…”

“जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर, या क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यातही याच क्षेत्रात जोमाने काम करणार. कारण, याने भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागाचाही चेहरामोहरा बदलू शकतो,” असेही नितीन गडकरींनी म्हटलं.