नाशिक – त्र्यंबक नगरीत शनिवारी चैत्र महिन्यातील एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून १५ हून अधिक दिंड्या दाखल झाल्या. दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना चंदनाची उटी लावण्यात आली. रात्री उशीराने ही उटी भाविकांना प्रसाद स्वरुपात देण्यात आली.

हेही वाचा – नाशिक : सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

Mahadev Favorite 6 zodiac signs
महादेवाला प्रिय आहेत ‘या’ ६ राशी, श्रावण महिन्यात बदलणार त्यांचे नशीब
ujani dam, rain, Pune district,
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य
Big fall in gold price in five days Nagpur
आनंदवार्ता.. पाचदिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण.. हे आहेत आजचे दर..
Yerawada, murder, Criminal,
पुणे : येरवड्यात वैमनस्यातून सराइत गुन्हेगाराचा खून, तिघांना अटक
yavatmal Bus Accident, Bus Accident in pusad, Bus En Route to Pandharpur for Ashadhi Ekadashi, accident happend in Pusad, Two Seriously Injured , accident news, yavatmal news, pusad news, marathi news, latest news,
वारकऱ्यांच्या बसला पुसदमध्ये अपघात; रस्ता दुभाजकाला धडकली बस
21 year old man drowned in a virar lake
विरारमध्ये  २१ वर्षीय तरुण  तलावात बुडाला
Central jail amravati, Bomb Like fire cracker, Bomb Like fire cracker Thrown into Amravati Jail, friend s birthday who in prison, Two Arrested, Amravati news, loksatta news, marathi news,
अमरावती : कारागृहातील मित्राच्‍या वाढदिवसानिमित्‍त फेकले बॉम्‍बसदृश्‍य फटाके, दोघांना अटक; पोलिसांनी…
Bridge collapsed in Bihar
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; १५ दिवसांतील दहावी घटना

हेही वाचा – नाशिक : विजय करंजकर कुटुंबाकडे ३९३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला विशेष महत्व आहे. उटीवारीसाठी कडाक्याच्या उन्हात दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या. मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजला. दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला. यावेळी भजन, हरिपाठ झाले. काल्याचे कीर्तन जयंत महाराज गोसावी यांनी केले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधीवरून उटी उतरविण्यात आली. उटी उतरल्यानंतर ती द्रवरुपात भाविकांना वाटण्यात आली. यासाठी २०० लिटरचे सात ते आठ पिंप देवस्थान परिसरात तयार ठेवण्यात आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान परिसरात पिण्याचे पाणी तसेच अन्य सुविधा करण्यात आली होती.