नवी मुंबई : नेरुळ सेक्टर सहा येथील अतिधोकादायक स्थितीत असलेल्या दत्तगुरू सोसायटीतील रहिवासी आधीच जीव मुठीत धरून जगत असताना आता त्यांच्या त्रासांत आणखी भर पडली आहे. सोमवारी सकाळपासून या इमारतीची वीज खंडित करण्यात आली आहे. शहरात ५८ अतिधोकादायक इमारती असताना आमच्याच सोसायटीचा वीजपुरवठा का खंडित केला, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्तगुरू सोसायटीत एकूण १३६ घरे आहेत. सध्या इमारतीत ११५ कुटुंब राहात आहेत. हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातले हे रहिवासी आहेत. इमारती बांधताना दोन इमारतींचे क्षेत्रफळ २,३६० चौ.मी. असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ११८० चौरस मीटरच क्षेत्रफळ देण्यात आले आहे. दोन इमारतींचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ २३६० आवश्यक असताना हे क्षेत्रफळ सिडकोकडे १,९६६ एवढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे नियमानुसार हक्काचे असलेल ३९४ मीटर क्षेत्रफळ कंडोमिनियम भूखंडाच्या स्वरूपात देण्याची मागणी रहिवासी सिडकोकडे वर्षांनुवर्षे करत होते. परंतु ती फाईल एका टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर जात आहे. इमारत धोकादायक स्थितीत असून भर पावसात रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अतिरिक्त भूखंडाचा प्रश्न अद्यापही रेंगाळतच पडला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dattaguru society building electricity discontinued
First published on: 01-08-2018 at 02:43 IST