-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले.
-
यानंतर शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्याचा हा आढावा. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
सगळ्या राज्यांचं चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये सांभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत – शरद पवार
-
अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये केली – शरद पवार
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केलं. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटलं – शरद पवार
-
खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तुत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसरी, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही – शरद पवार
-
संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी ९८-९९ टक्के हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे, उच्च दर्जाचा आहे – शरद पवार
-
संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठवेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वतःचं कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतो – शरद पवार
-
म्हणूनच मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही – शरद पवार
-
कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे – शरद पवार
-
अशावेळी संसदीय सदस्य हीदेखील संस्था आहे हे मोदींनी लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे – शरद पवार
-
मोदींनी शिखर बँकेबाबत आरोप केले. मात्र, शिखर बँक तर सोडाच, पण मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेलं नाही – शरद पवार
-
शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपाच्या काही लोकांची नावं आली – शरद पवार
-
शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती – शरद पवार
-
-
मोदींनी अशाप्रकारे शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती – शरद पवार
-
मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा – शरद पवार
-
अमेरिकेचा दौरा आणि भारतातील स्थिती पाहून ते निराश झाले आणि त्या निराशेतूनच त्यांनी असा हल्ला केला असावा – शरद पवार
-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यात मोदींनी समान नागरी कायद्यावर त्यांनी मत मांडलं – शरद पवार
-
ते म्हणाले की, एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात – शरद पवार
-
यावर माझ्या पक्षाची भूमिका मी सांगतो. केंद्र सरकारने विधी आयोगाकडे (लॉ कमिशन) हा विषय सोपवला. विधी आयोगाने या कामात रस असलेल्या विविध संस्थांकडून प्रस्ताव मागितले – शरद पवार
-
यानंतर विधी आयोगाकडे ९०० प्रस्ताव आले आहेत. त्या प्रस्तावांमध्ये काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही. तसं विधी आयोगानेही जाहीर केलेलं नाही – शरद पवार
-
असं असलं तरी विधी आयोगासारखी जबाबदार संस्था या विषयाच्या खोलात गेली आणि त्यांनी लोकांचे अभिप्राय मागवले आणि ९०० अभिप्राय आले – शरद पवार
-
आता विधी आयोगाने खोलात जाऊन या प्रस्तावांमध्ये काय शिफारसी आहेत याची माहिती देणं गरजेचं आहे – शरद पवार
-
समान नागरी कायद्यावर शीख, ख्रिश्चन, जैन धर्मांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे – शरद पवार
-
मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात समान नागरी कायद्यावर वेगळं मत आहे, असं माझ्या कानावर आलं आहे – शरद पवार
-
समान नागरी कायद्याला पाठिंबा देण्याची शीख धर्मियांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी अधिक माहिती घेत आहे – शरद पवार
-
शीख धर्मातील लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे किंवा विधी आयोगाकडे आलेल्या शिफारशींची नोंद न घेता यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही – शरद पवार
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नाला हात घातला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची एकदा स्पष्टता यावी – शरद पवार
-
यावर पंतप्रधान मोदींनी किंवा इतर कुणी भूमिका मांडावी. त्यानंतर माझा राजकीय पक्ष यावर निर्णय घेईन. पूर्ण माहिती आल्यावरच निर्णय घेणं योग्य होईल – शरद पवार
-
देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांविषयी नाराजी व अस्वस्थता आहे – शरद पवार
-
या नाराजी आणि अस्वस्थतेपासून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हा प्रयत्न आहे की काय अशी शंका यायला आज जागा आहे – शरद पवार
-
ही अस्वस्थता पंतप्रधान मोदींमध्ये असावी. कारण यानंतर एका वर्षात देशाच्या निवडणुका येतील. मधल्या काळात मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्यांच्या निवडणुका आहेत – शरद पवार
-
आज केरळपासून काश्मीर-हिमाचल प्रदेशपर्यंत पाहिलं, तर आजचा सत्ताधारी पक्ष भाजपाचा लोकमताचा पाठिंबा राज्यपातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे – शरद पवार
-
देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवला आणि कोणत्या राज्यात भाजपा सत्तेत आहे आणि कोणत्या नाही असं बघितलं तर स्थिती स्पष्ट होते – शरद पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
“मी मुंबई सोडली”, अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘या’ अरब देशात झाली शिफ्ट; म्हणाली, “काही कठीण निर्णय…”