तेलंगणामध्ये राबविलेल्या शेतकरी व दलित उत्थानाच्या योजनांच्या आधारे महाराष्ट्रात पाय पसरण्याचे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांना आता मोठी खीळ बसणार आहे. मोठी ताकद लाऊन मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला सात जागा कशाबशा राखता आल्या. तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रात ‘ब’ चमू म्हणून चर्चेत असणाऱ्या ‘एमआयएम ’ आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्येही पराभवामुळे चलबिचल दिसून येत असतानाच याचा लाभ काँग्रेसला मिळवता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे.

तेलंगणातील ‘केसीआर’ यांची ताकद कशी कमी होते, हे स्पष्ट झाल्याची टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही केली. दुसऱ्या बाजूला ‘एमआयएम’ला कशाबशा गेल्या विधानसभेत जेवढ्या सात जागा होत्या तेवढ्याच राखता आल्या. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यात ओवेसी यांचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा सुरू झाल्याने ‘ब’ चमूचे अपयश काँग्रेसला उपयोगी पडू शकते, असे सांगण्यात येत आहे.

PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
Sanjay Raut On Sharad Pawar VS Ajit Pawar
Sanjay Raut : “शरद पवार हे अजित पवारांना सोडून बाकीच्या सर्वांना पुन्हा…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Malegaon, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Ajit Pawar met Aasif Shaikh, Jan samman Yatra, Asif Shaikh, Sharad Pawar group, Congress, Sheikh family, defections, conciliatory relationship, BJP alliance, Malegaon Central Constituency, independent elections, Maha vikas Aghadi
अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी
Ajit Pawar gets emotional at the Women Gathering The Security Shield of Sisters Around Me
‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक

हेही वाचा – रायगड लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा !

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरणात तेलंगणामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रभावी प्रसार केसीआर यांनी केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती हा पक्षही ‘ब’ चमूचा ‘ब’ चमू अशी टीका केली जाऊ लागली होती. हिंगाेली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी आडून – आडून खेळू नका, मैदानात या, असे आव्हान दिले होते. पण बीआरएसच्या पराभवाबरोबरच ‘एमआयएम’ चा प्रभाव वाढला नाही. उलट मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला स्वीकारल्याची चर्चा राजकीय पटलावर होऊ लागली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तयाज जलील यांनीही तेलंगणातील मुस्लिम मते काँग्रेसला गेल्याचे सांगितले. मात्र, त्याचा एमआयएमच्या जागांवर परिणाम झाला नाही. सात जागा राखता आल्या. नव्या दोन विधानसभा मतदारसंघात प्रभाव वाढला पण त्यात विजय मिळाला नाही, हे मान्य केले. तेलंगणातील सत्ताधारी बदलल्यामुळे राज्यातील काही गणिते बदलण्याची शक्यता आता पुन्हा व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये राज्य सरकार पुरेसा निधी देत नसल्याने त्यांनी ‘आम्हाला तेलंगणात जाऊ द्या’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय कार्यशैलीवर मोठे प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील योजनांच्या कार्यशैलीचे कौतुक राज्यातील नेते करू लागले. बीड, लातूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी तेलंगणात जाऊन पाहणी केली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी नाराज असणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘केसीआर’ यांच्या कामाचे कौतुक केले होते. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पातळीवर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या अनेक नेत्यांनी ‘तेलंगणा प्रारुपा’चे तोंड भरून कौतुक केले. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी केसीआर पाय विस्ताराला सुरुवात करतील आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. केसीआर यांनीही राज्यात काही ठिकाणी सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांवर तेलंगणातील योजनांची चित्रफीत दाखविण्याचीही व्यवस्था केली होती. तेलंगणातील पराभवामुळे तो प्रभाव निर्माण करण्यास आता अडचणी येतील असे सांगण्यात येत आहे. शेती आणि शेतकरी हा मतदार व्हावा हा ‘केसीआर’ यांचा प्रयोग ‘मराठा- ओबीसी’ वादामुळेही प्रभावहीन ठरण्याची शक्यता होतीच. तेलंगणामधील पराभवामुळे आता ‘बीआरएस’च्या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अमरावतीत भाजपपुढे आव्‍हान

तेलंगणामध्ये भाजपाने ‘केसीआर’ यांना ‘निजाम’ म्हटले होते. केसीआर आणि ‘एमआयएम’यांची आघाडीही होती. एमआयएम पक्षाचा प्रभावही आता घसरला आहे. त्यांना कशाबशा सात जागा मिळाल्या. मुस्लिम मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यात एमआयएम या पक्षाला माफक यश आले. असे करताना एमआयएम या पक्षावर असणारा ब चमू शिक्का या वेळी पुन्हा गडद झाल्याने विभागलेले मतदान काँग्रेसच्या पथ्यावर पडेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे आणि ते एमआयएमकडे वळल्याचे काही मतदारसंघात पूर्वी दिसून येत होते. आता ती बाब जर थांबली तर त्याचा फायदा मात्र काँग्रेसला होऊ शकतो, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील म्हणाले.