शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी पक्षकारांशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालायच्या सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक, कौटुंबिक न्यायालायचे प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा , न्यायाधीश मनीषा काळे, कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष ॲड. वैशाली चांदणे, माईंड पाॅवर ट्रेनर या संस्थेचे डाॅ. दत्ता कोहिनकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: मेट्रो प्रकल्पाजवळील जागेत गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सव्वाकोटींची फसवणूक

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?

गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरुन दाम्पत्यात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाचा व्याप तसेच धावपळीमुळे ताणतणावाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे सहनशीलता कमी होत चालली आहे. किरकोळ वादातून दाम्पत्यातील वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. त्यामुळे दाम्पत्याने एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. संसार सुरळीत ठेवण्यासाठी एकमेकांना समजावून घेणे गरजेच आहे, असे प्रमुख जिल्हा न्यायधीश श्याम चांडक यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; घोरपडे पेठेतील घटना

या वेळी डाॅ. दत्ता कोहिनकर यांनी पक्षकारांशी संवाद साधला. अहंकाराला बाजूला ठेवून प्रत्येकाने एकमेकांना समाजवून घ्यायला हवे. एकमेकांचे गुणदोष स्वीकारायला हवे. मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा, असे डाॅ. कोहिनकर यांनी नमूद केले. किरकाेळ वाद झाल्यास थेट न्यायालयात जाणे योग्य नाही. एकमेकांना माफ करुन संसाराचा गाडा हाकायला हवा, असे आवाहन न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी केले.
ॲड. वैशाली चांदणे यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले. ॲड. विजय सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अजय डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.