दिल्ली: बिहारची निवडणूक २०२५ मध्ये होणार आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणण्याचे ध्येय आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक होईपर्यंत खासदारकीसाठी इच्छुक नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली.

राज्यसभेसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली. बिहारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर विनोद तावडे यांचेही नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही तावडे यांना भाजपकडून तिकीट मिळणार का, या बाबत चर्चा आहे. राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुस्तक महोत्सवाला तावडे यांनी भेट दिली.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

हेही वाचा – माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी भाजपच्या राज्यसभा उमेदवार; कुलकर्णी यांचे पुनर्वसन

खासदारीबाबत विचारले असता तावडे म्हणाले, की बिहारची निवडणूक हे सध्या प्राधान्य आहे. या निवडणुकीतून भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक होईपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे खासदारकीसाठी इच्छुक नाही. २०२५ नंतरच खासदारकीबाबत विचार करता येईल.

हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे मागासवर्ग आयोगातून मेश्राम यांना हटविल्याचा आरोप

उमेदवारीमध्ये समतोल

राज्यसभेसाठी भाजपकडून दिलेल्या उमेदवारीबाबतही तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारीमध्ये चांगल्या प्रकारे समतोल राखण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.