मुलीचे लग्न करून देणे हा एकमेव उद्देश सध्या मुस्लीम समाजात दिसतो. त्यात अनेकदा अल्पवयीन मुलींचा मर्जीविरोधात विवाह करून दिल्याने त्यांची फरफट होते. हे सगळे टाळायचे असेल तर मुलींना शिक्षण दिले पाहिजे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे व त्यांना समान अधिकारही दिले पाहिजेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी येत्या २१ जूनपासून १५ इस्लामी देशांमध्ये ‘वर्ल्ड पीस अ‍ॅण्ड फ्रेण्डशिप मिशन’ कार्यक्रमांतर्गत तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी दीड महिन्याकरिता जाणार आहे. तेथे जाण्यापूर्वी असा विचार मनात आला की, भारतामधील मुस्लीम मुलींची स्थितीही फार बिकट आहे. आमच्या संस्थेमध्ये मागील वर्षी १७ नं.चा फॉर्म भरून २० शाळाबाह्य़ मुलींना दहावीच्या परीक्षेसाठी मोफत शिक्षण देण्यात आले. त्याचा सर्व खर्च संस्थेने केला. मुलींनी शाळा सोडून  सहा-सात वर्षे झालेली होती. काही मुली ६ वी, ७ वी किंवा ८ वी शिकलेल्या होत्या. त्यांच्या मागे संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. त्यांना वर्गात आणण्यापासून ते परीक्षा होईपर्यंत इतकेच काय, ज्या शाळेत शिबीर किंवा प्रात्यक्षिक होते, तिथे आणण्यासाठी त्यांच्या पालकांची मानसिकता तयार करणे, त्यांची सहमती मिळविणे व मुलींना पाठविण्यास राजी करणे तसे कठीण काम होते. एक तर मुलींना शिकून काय करायचे आहे किंवा मुलींचे तर लग्नच करायचे आहे व त्यांना चूल व मूलच सांभाळायचे आहे म्हणून त्यांचे शिक्षण सोडून दिले गेले  होते. त्याला आर्थिक परिस्थितीही कारणीभूत होती. काही मुलींच्या शिक्षण सोडण्यामागचे कारण घरातील कामे होते, तर काहींच्या मागे स्वत: शाळा जबाबदार होत्या. ज्या मुली शिकायला तयार झाल्या व ज्या दररोज वर्गात यायच्या व ज्यांनी इतक्या वर्षांनंतर पेन व पुस्तक हातात घेतले व विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची ही हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांपैकी बऱ्याच जणी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णही झाल्या. मुलींच्या आयुष्याचे लक्ष्य फक्त लग्नच असते, हे मिथक तोडण्याचा व लग्नाशिवायही स्वप्ने असतात व हे स्वप्न देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता.

मराठीतील सर्व संघर्ष संवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should women have equal rights to men
First published on: 13-06-2016 at 03:20 IST