तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याआधी मुंबई महानगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडकसागर ही धरणे एक दुसऱ्या दिवसाच्या अंतराने ओसंडून वाहू लागली होती.

शुक्रवारी शहापूर तालुक्यात ६६.६ मिमी. पावसाची नोंद झाली असून भातसा धरणाची पाणीपातळी १३९.६८ मी. इतकी वाढल्यानंतर आज शुक्रवारी दुपारी १.३० वाजता भातसा धरणाचे  ५ वक्रीदरवाजे ०.२५ मी. अंतराइतके वर उघडण्यात आले आहेत. त्यांतून १०७.७५ घनमीटर प्रतीसेकंद अर्थात ३ हजार ८०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी

तालुक्यात पावसाचा जोर अद्यापी कायम असून भातसा नदीला पुर आला आहे. त्यातच धरणाच्या पाण्याचाही समावेश झाल्याने भातसा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता ओळखून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील सापगांव पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने शहापूर – मुरबाड या मुख्य रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांनाही दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.