ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, ईंटर्निटी या परिसरात पाणी पुरवठा सुरु राहिल. तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवार २८ मे रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्रमांक -१ या परिसराचा पाणी पुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.