बदलापूरः कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने मंगळवारी तत्काळ रेल्वे बोर्डाला पाठविले. या पत्रामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची आशा आहे. सोमवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबतची मागणी केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या वेगवान निर्णयाची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

बहुतप्रतिक्षित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. २०१९ साली हा मार्ग अधिकृतपणे घोषीत करण्यात आला होता. या कामासाठी आणि काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के खर्च उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. गेल्या अडीच वर्षांत याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. त्यामुळे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५० टक्के खर्चाला मंजुरी देत त्यासाठी हमी पत्र रेल्वे बोर्डाला देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार सोमवारी राज्य सरकारच्या गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव आर. एम. होळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठवत ५० टक्के खर्चाची हमी घेतली आहे. २४ तासात झालेल्या या प्रक्रियेची आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगली आहे. त्याचवेळी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने ५० टक्के खर्चाची शाश्वती दिल्यामुळे आता निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. निविदा मंजूर झाल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दर्शविल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana,
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही
Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर