मुंबई : उल्हासनगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवरून जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.  आरोपीने तरुणीला रात्रभर कोंडून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी श्रीकांत गायकवाड (३०) या आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी ही उल्हासनगर येथे आजीसह राहते. ती शिर्डी येथे आईला भेटण्यासाठी गेली होती. तेथून शुक्रवारी रात्री ती उल्हासनगर रेल्वे स्थानकात आली. रात्री ९ वाजता स्थानकातून बाहेर पडून ती स्कॉयवॉकवरून घरी निघाली होती. यावेळी तिला तिचे दोन मत्र भेटले. ती त्यांच्याशी बोलत असतानाच आरोपी श्रीकांत तेथे आला. त्याच्या हातात हातोडासदृश वस्तू होती. त्याने त्याचा धाक दाखवल्यानंतर त्या दोघांनीही तेथून पळ काढला.  त्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्ती ओढत रेल्वे स्थानकाजवळील अल्बर्ट पार्किंगच्या मागील बाजूस असलेल्या एका खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक  अत्याचार केले. सकाळी आरोपी तेथे नसल्याचे लक्षात येताच तिने तेथून पळ काढला. रस्त्यावर येताच तिने एका व्यक्तीकडून मोबाइल घेऊन मित्राला फोन केला. मित्राने पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देताच ती त्याच अवस्थेत हिल रोड पोलीस ठाण्यात गेली.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
NCP ajit pawar Dissident A.Y. Patil Extends Support to Maha vikas Aghadi Backs Shahu Maharaj
कोल्हापूर : अजितदादांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
nashik police child marriage, nashik child marriage marathi news
नाशिक: पोलिसांच्या दक्षतेने बालविवाह रोखण्यात यश

ही घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने हिल रोड पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी पीडितेला घेऊन रेल्वे पोलीस ठाण्यात गेला. रेल्वे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून पीडितेने केलेल्या वर्णनावरून आणि खबऱ्याच्या माहितीवरून आरोपीला दुपारी ४च्या सुमारास अटक केली.

स्कायवॉक असुरक्षित…

उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर पोलीस तैनात नसतात. तसेच त्या परिसरात कोणताही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगार टोळक्यांचा वावर वाढल्याचे सांगितले जाते.