रिलायन्स या देशातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीची स्थापना केली ती धीरुभाई अंबानी यांनाी. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना धीरुभाईंनी शून्यातून आपल्या उद्योगाची सुरुवात केली. गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात विश्व २८ डिसेंबर १९३२ रोजी धीरुभाईंचा जन्म झाला. सुरुवातीच्या दिवसात धीरुभाईंनी सर्वसामान्यांप्रमाणे नोकरीचा अनुभव घेतला. त्यानंतरचा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा होता.

१९६६ मध्ये धीरुभाईंनी रीलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यांचे व्यक्तिमत्व हे कायमच तरुणांना प्रेरणा देणारे ठरले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यानंतर रिलायन्सचा कारभार मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी सांभाळत आहेत. व्यापार-उद्योगासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना २०१६ मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण या नागरी क्षेत्रातील दुस-या क्रमाकांच्या पुरस्काराने सन्मानित केले. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगत असताना त्यांना वडिलांकडून मिळालेला सक्सेस मंत्र सांगितला. आपल्या या चोखपणामुळेच रिलायन्स उद्योग खूप वरच्या स्तरावर नेऊन ठेवला.

समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्यापेक्षा ती निर्माण कशी कशी होणार नाही हे शोधणे आवश्यक आहे. तसेच समस्येच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण तयार होत जातो. कोणतेही काम सुरु करण्याआधी आपले लक्ष्य निश्चित करायला हवे. अन्यथा हाती काही लागत नाही. आयुष्यात आणि व्यवसायात प्रत्येकाला कधी ना कधी यश आणि अपयश येतेच. पण अपयशाने खचून न जाता परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टीकोन खूप महत्त्वाचा असतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे सकारात्मकता असणे गरजेचे असते.