टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे, हा सामना विराटच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे आणि प्रत्येकजण या सामन्यात कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट अनेक दिवसांपासून आपल्या बॅटने १०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही, त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, भारत-श्रीलंका मॅचदरम्यान एक असा फोटो समोर आला आहे, ज्याने सगळ्यांनाच हसू आलं आणि आता हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोहलीचे शतक आणि चाहत्याचे लग्न

४ मार्च हा विराट कोहलीसाठी सर्वात खास दिवस ठरला आहे, या तारखेला विराटने त्याच्या १००व्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरले. यासोबतच भारताच्या पहिल्या डावात १०० व्या कसोटी सामन्यात विराटकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती, मात्र तो केवळ ४५ धावा करून बाद झाला. ज्यानंतर चाहत्यांची प्रतीक्षा ही निव्वळ प्रतीक्षा ठरली आहे, पण विराटचा एक चाहता आहे ज्याने आपल्या शतकासाठी आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट थांबवली आहे.

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

भारत-श्रीलंका कसोटी सामन्यादरम्यान खास पोस्टरसोबत एक चाहता दिसला. या चाहत्याने पोस्टरवर एक मजेदार गोष्ट लिहिली होती. त्याने पोस्टरवर लिहिले होते- विराटने ७१ वे शतक पूर्ण करेपर्यंत मी लग्न करणार नाही. आता या पोस्टरचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपला आहे एक फोन; तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

शेवटचे शतक कधी मारले होते?

एक काळ असा होता की, विराट सर्व विक्रम आपल्या नावावर करेल. पण २०१९ सालापासून त्याची बॅट शांत झाली आणि त्याच्या बॅटने शतक झळकावताना चाहत्यांना आसुसले. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटीत विराटने शेवटचे शतक झळकावले होते.