सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. या घटनेत तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.