करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा – सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांनी शहरात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली धडक सशस्त्र संचलन केले. या निमित्ताने शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शहराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.