शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आजही फार कमी आहे. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केले.
सावित्रीबाई शाळेतील मुलींच्या वसतिगृहाचे उदघाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.  आमदार पंकजा मुंडे-पालवे, खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळा हेगडे, प्रताप ढाकणे, नामदेव राऊत, सभापती सोनाली बोराटे आदी या वेळी उपस्थित होते. तालुक्यातील मुलींचे हे पहिलेच वसतिगृह आहे. विनोद दळवी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ते सुरू केले आहे.
मुंडे म्हणाले, की ग्रामीण भागात शालेय स्तरापर्यंत मुलींची संख्या चांगली असते, मात्र त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात मुलींची संख्या घटते. चांगल्या शैक्षणिक सोयींचा अभाव, सुरक्षिततेचा प्रश्न आणि पालकांकडून होणारी लग्नाची घाई यामुळे ही स्थिती आहे. अशाही स्थितीत मात्र विनोद दळवी यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलींना त्यामुळे शिक्षणाची योग्य सोय होऊ शकते असे मुंडे म्हणाले. देशात सावित्रीबाई फुले यांनी स्त्र शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे मुलींना शिक्षण घेता येऊ लागले असेही त्यांनी सांगितले. दळवी यांनी सर्वांचे स्वागत केले.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र