घरात पतीबरोबर झालेल्या भांडणामुळे मनस्ताप होऊन एका महिलेने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिला वाचविण्याच्या प्रयत्नात भाजून जखमी झालेला तिचा मुलगाही मरण पावला. शहरातील जुन्या कुंभारी नाक्याजवळ आदर्शनगरात ही घटना घडली.
भारती श्रीनिवास अन्नलदास (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात आईच्या खोलीतून पहाटे तिच्या ओरडण्याचा आवाज व धूर येऊ लागल्याचे पाहून रमेश अन्नलदास (वय ३०) हा संगणकावर काम करीत बसलेला मुलगा धावत खोलीजवळ गेला. त्यावेळी आईने पेटवून घेतले होते. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात रमेश याने आईला मिठी मारली. यात दोघेही गंभीर भाजून जखमी झाले. दोघांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता आई भारती ही मरण पावली. नंतर मुलगा रमेश यानेही जीव सोडला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.