अंबरनाथ तालुक्यातील वालिवली गावातील १४ वर्षीय युवकाने सोमवारी वालिवली पुलावरून उल्हास नदीत उडी मारून आत्महत्या केली. या युवकाचे नाव गणेश रमेश म्हसकर असून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. त्यावेळी पुलावरून जात असलेले बदलापूर पालिकेचे अभियंता संजय हिंगमोरे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल तसेच पोलीस ठाण्यास खबर दिली. बदलापूर पालिकेच्या अग्निशमन पथकाने त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. रात्री १० वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.