शहरातील अभयसिंह राजेंद्र फाळके हे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी राजेंद्र फाळके यांच्या घरी येऊन सत्कार करतानाच त्याचे तोंडभरून कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र फाळके यांनी पवार यांचे स्वागत केले. पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश धस, विक्रम पाचपुते, काकासाहेब तापकीर, नितीन धांडे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अगरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
 पवार म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू लागले आहेत. स्पर्धेतील हे बौध्दिक यश वाखाणण्याजोगे आहे. अभयसिंह फाळके याने मोठय़ा कष्टाने हे यश मिळवले, मात्र येथेच न थांबता आणखी प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
सत्काराच्या औपचारिक कार्यक्रमानंतर मात्र पवार यांनी कर्जत शहरातील रस्त्यावरील अडथळ्यांबद्दल अधिका-यांना चांगलेच फटकारले. सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले हे खांब रहदारीला धोकादायक असून ते तातडीने काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अतिक्रमणे काढताना व्यापा-यांचे पुनर्वसन करण्याचेही आवाहन त्यांनी केले. कर्जत-राशिन रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्याबद्दलही पवार यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. तुमच्या गावापर्यंत स्वच्छता अभियान पोहोचलेले दिसत नाही, असा टोला लगावत याबद्दलही त्यांनी कानउघडणी केली.  

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा