मुळा धरणाचे आवर्तन उशिरा सुटल्यामुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीस सत्ताधारी आमदार शंकरराव गडाख व प्रशासनच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे नेवासे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
मुरकुटे यांनी म्हटले आहे, की या वेळेचा दुष्काळ हा गडाखांच्या राजकारणामुळे आहे. काँग्रेसने ऑक्टोबर २०१३मध्ये जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते. नोव्हेंबरमध्ये रास्ता रोको करून डिसेंबर, फेब्रुवारी, एप्रिल या महिन्यांत आवर्तने सोडण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु कालवा समितीच्या डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत ५ जानेवारीला रब्बी व एप्रिलमध्ये खरीप असे दोनच पाण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रब्बीचे आवर्तन एक महिना उशिरा झाले आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, ऊस ही हातची पिके गेली आहेत.
सत्ताधा-यांना वेळेवर पाणी सोडण्याचे अधिकार नसतील तर त्यांनी श्रेयाचे राजकारण करू नये अशी टीका करत फाटके यांनी सत्ताधारी पावसाचेसुद्धा श्रेय घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत अशी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla gadakh and administration responsible for the farmers damages
First published on: 10-01-2014 at 02:37 IST