चारित्र्याचा संशय व इंडिका मोटार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाही म्हणून तुळापूर (ता. राहुरी) येथे विवाहितेच्या डोक्यात मारून नंतर विष पाजून तिचा खून करण्यात आला. नंतर विहिरीत प्रेत टाकण्यात आले.
तुळापूर येथील वैशाली गोविंद हारदे (वय ३०) या विवाहितेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा गोविंद सर्जेराव हारदे, सासरा सर्जेराव विठोबा हारदे, सासू कमलाबाई सर्जेराव हारदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
वैशाली हारदे हिच्या चारित्र्यावर सासरचे लोक नेहमी संशय घेत. तिचा छळ करीत. इंडिका मोटार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणूनही तिचा छळ केला जात होता. पैसे आणले नाही म्हणून वैशाली हारदे हिला विष पाजून, तिच्या डोक्यात टणक वस्तूने मारून खून करण्यात आला. नंतर तिचे प्रेत घराजवळच्या विहिरीत फेकून देण्यात आले. राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of married women for dowry
First published on: 10-07-2013 at 01:32 IST