संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेच्या मिरारसाहेब दर्गा परिसरातील ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस बुधवारी प्रारंभ झाला.  खाँ साहेबांच्या शिष्यांनी संगीत सेवा सादर करून आदरांजली वाहिली.
  डोंबिवलीच्या समीर अभ्यंकर यांनी ललत राग आळविला. उ. फारूक लतीफ खान (मुंबई) यांनी सारंगी वादनात चारूकेशी राग वाजविला. कोल्हापूरच्या पं. किशोर कागलकर यांनी गुजरी तोडी रागामध्ये गायन केले. पं. चंद्रशेखर वझे (मुंबई) यांनी जाउनपुरी हा राग आळविला. पुण्याच्या चंद्रशेखर गाडगीळ यांनी गझल गायन केले. तर पं. सहदेव झेंडे (कवलापूर) यांनी बैरागी रागात गायन केले.  
पहिल्या सत्रातील संगीत सभेला तबल्यावर दादा मुळे, जितेंद्र भोसले, सुनील राजे, सागर सुतार आणि पेटीवर अजित पुरोहित, सिद्धेश बिचोलकर यांनी साथसंगत केली. तीन दिवसांच्या संगीत सभेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, हुबळी, बेंगलोर, चैन्नई, धारवाड आदी ठिकाणचे पन्नास कलाकार संगीत सेवा सादर करणार आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music festival started in miraj in memory of karim khan
First published on: 07-06-2013 at 01:56 IST