पुलाच्या कठडय़ाला मोटार धडकल्याने िहगोलीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास पोखर्डी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. मृतांमध्ये महाराष्ट्र वीज वितरण कंपनीतील दोघा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दिलीप श्रीकिशन जाजू (वय ४४, रा. िहगोली), दामोदर तुळशीराम व्हीके (२, रामकृष्णनगर, हिंगोली) व संतोष नारायण जाधव (२५, माळहिरवा, हिंगोली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जाजू महावितरणमध्ये अभियंता तर व्हीके अकौंटंट व जाधव हा वाहनचालक असल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली. एमआयडीसी पोलीसांनी अपघातीची नोंद केली आहे.
तिघेही टाटा व्हिस्टा मोटारीतून (एमएच ३८-३८४९) मुंबईला गेले होते, काम आटोपून नगरमार्गे औरंगाबादहून हिंगोलीस जाणार होते, नगरहून पुढे जाताना पोखर्डी गावाजवळ पुलाच्या कठडय़ाला मोटार धडकली. धडक जोरात होती, त्यामुळे कठडय़ाचा खांब मोटारीचा पत्रा फाडून मागील सीटपर्यंत गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in accident on bridge near nagar
First published on: 13-01-2013 at 02:16 IST