मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- सिडको शहर व्यवस्थापनासाठी आता नागरिकांची सल्लागार समिती
- शिक्षकीध्यासातून नृसिंह अवताराचे सचित्र दर्शन..!
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून आतापर्यंत १४ जण यामुळे दगावले आहेत. वाढत्या गारठय़ामुळे अनेकांनी सोमवारी घराबाहेर पडणे टाळले. दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी ५.५ इतके तापमान नोंदविले गेले. शहरातील सरासरी किमान तापमानापेक्षा हे दोन अंश सेल्सियसने कमी आहे. थंडी आणि धुक्यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशातही थंडीचा जोर कायम असून राज्यात यामुळे आतापर्यंत ८३ जण दगावले आहेत.
सोमवारी जालून आणि भडोची जिल्ह्यात सोमवारी तीन जण मृत्युमुखी पडले; तर आझमगड, बहरीच जिल्ह्यांत दोन, तर गाझीपूर आणि सोनभद्र जिल्ह्यात एकाचा थंडीमुळे मृत्यू झाला. राज्यातील काही भागात सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील सर्वात कमी तापमान मुझफ्फरनगरमध्ये ४ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.
पंजाब व हरियाणा राज्यातही थंडीमुळे जनजीवन गारठले असून रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाढत्या धुक्यामुळे चंदीगड विमानतळावरून सोमवारी सुटणारी बहुतेक विमाने रद्द करण्यात आली. तसेच राज्यातील बहुतेक रेल्वे उशिराने धावत होत्या. या थंडीचा पाणी व वीज पुरवठय़ावरही परिणाम झाल्याने सामान्य नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















