सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी भारताला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. जितु राय, समरेश जंग आणि प्रकाश नान्जप्पा यांनी १० मीटर एयर पिस्तुल सांघिक प्रकारात भारतासाठी ब्राँझपदक पटकवण्याची कामगिरी केली. भारताने १७४३ गुणांसह तिसरे स्थान मिळवले तर १७४४ गुणांसह दक्षिण कोरियाने स्पर्धेत सुवर्ण पदक आणि चीनने रौप्यपदक पटकावले.
जितू रायने सांघिक प्रकारात ५८५ गुण मिळवले, तर समरेश जंग आणि प्रकाश नांजप्पा यांनी अनुक्रमे ५८० आणि ५७८ गुण मिळवले. यासोबतच जितू रायने आतापर्यंत या स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके मिळवली आहेत. याआधी त्याने ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.