आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चीन आणि जपानवर मात केल्यानंतर भारतीय संघ आता ओमानचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र दुखापतींनी भारतीय संघाला ग्रासले आहे. धर्मवीर सिंग पायाच्या घोटय़ाच्या तर एस. व्ही. सुनील खांद्याच्या दुखापतींनी त्रस्त असल्याने भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांच्या चिंता वाढल्या आहेत. धर्मवीर आणि सुनील यांच्या अनुपस्थितीमुळे नॉब्स यांना संघाच्या रणनीती बदल करावा लागणार आहे. दरम्यान भारत, पाकिस्तान आणि मलेशिया या तिन्ही संघांनी दोन सामने जिंकले असून त्यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत.