आर्थिक संघर्षांमुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाईघाईने जाहीर केलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ नोव्हेंबरला कटक येथे खेळवण्यात येणार आहे. पाचही सामने दिवस-रात्र स्वरूपाचे असतील आणि अखेरचा सामना रांचीला होईल. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता येथे अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा सामना होईल.