प्रतिस्पर्धी संघाच्या मोठय़ा धावसंख्येसमोर न डगमगता महाराष्ट्राच्या फलंदाजांनी रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत पहिल्या डावात १ बाद ११० अशी आश्वासक सुरुवात केली. तामिळनाडूने पहिल्या डावात ५४९ धावांपर्यंत मजल मारली़ संक्षिप्त धावफलक – तामिळनाडू : (पहिला डाव) २२६.४ षटकांत सर्व बाद ५४९ (दिनेश कार्तिक ११३, विजय शंकर ९१, रामस्वामी प्रसन्ना ७२, बाबा इंद्रजीत ६९, मलोलान रंगराजन ६७, अनुपम संकलेचा ३/११५) वि़ महाराष्ट्र : (पहिला डाव) ३२ षटकांत १ बाद ११० (स्वप्निल गुगळे खेळत आहे ५६, चिराग खुराणा खेळत आहे ३६).